This page requires a JavaScript-enabled browser
Instructions on how to enable your browser are contained in the help file.
9 स्वातंत्र्यलढ्याचे अंतिम पर्व
1.
1935 च्या कायद्याने 1937 ला देशातील अकरा प्रांतात झालेल्या निवडणुकांमध्ये किती प्रांतात कॉंग्रेसची मंत्रिमंडळे सत्तेवर आली ?
1) आठ
2) अकरा
3) सात
4) नऊ
2.
'क्रिप्स मिशन म्हणजे, बुडीत बॅंकेवरील पुढील तारखेचा चेक(धनादेश)' असे कोणी म्हटले ?
1) सुभाषचंद्र बोस
2) सरदार वल्लभभाई पटेल
3) महात्मा गांधी
4) प. जवाहरलाल नेहरू
3.
इंग्लंडचे प्रधानमंत्री विस्टन चर्चिल यांनी कोणत्या हेतूने मार्च 1942 मध्ये क्रिप्स मिशन भारतात पाठवले ?
1) जपानने भारतावर आक्रमण केल्यास त्याला प्रतिकार करण्यासाठी भारतीयांचे सहकार्य मिळावे.
2) दुसऱ्या महायुद्धाच्या काळात राष्ट्रीय सभेने संघराज्याची शासनव्यवस्था पहावी.
3) आझाद हिंद सेनेने जपानला भारतावर आक्रमण करण्यास रोखावे.
4) वरील सर्व
4.
भारत इंग्लंडच्या बाजूने दुसऱ्या महायुद्धात सामील झाल्याची घोषणा कोणी केली ?
1) व्हॉईसरॉय लॉर्ड लिनलिथगो
2) व्हॉईसरॉय लॉर्ड वेव्हेल
3) व्हॉईसरॉय लॉर्ड माउंटबॅटन
4) व्हॉईसरॉय विस्टन चर्चिल
5.
7 ऑगस्ट 1942 रोजी मुंबईच्या गवालिया टँक मैदानावर सुरु झालेल्या राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते ?
1) महात्मा गांधी
2) मौलाना अबुल कलाम आझाद
3) प. जवाहरलाल नेहरू
4) आचार्य जे.बी.कृपलानी
6.
8 ऑगस्ट 1942 रोजी पंडित जवाहरलाल नेहरूंनी मांडलेला ________ ठराव बहुमताने मंजूर झाला.
1) असहकार
2) छोडो भारत
3) संपूर्ण स्वराज्य
4) सविनय कायदेभंग
7.
चलेजाव चळवळीतील खालील उद्गार कोणाचे ते ओळखा :
"आपण भारताला स्वतंत्र तरी करू किंवा हे भगीरथ प्रयत्न करत असताना मारून तरी जाऊ."
1) सरदार वल्लभभाई पटेल
2) प. जवाहरलाल नेहरू
3) महात्मा गांधी
4) डॉ. बाबासाहेब आंबेडकर
8.
छोडो भारत आंदोलनाच्या वेळी भारताचा व्हॉईसरॉय कोण होता ?
1) लॉर्ड लीनलिथगो
2) लॉर्ड मिंटो
3) लॉर्ड वेव्हेल
4) लॉर्ड डफरीन
9.
खालीलपैकी कोणती चळवळ नेत्यांविना चालवलेली चळवळ म्हणून ओळखतात ?
1) असहकार चळवळ
2) भूदान चळवळ
3) सविनय कायदेभंग चळवळ
4) चलेजाव चळवळ
10.
ब्रिटीश सरकार भारतीयांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करत असल्यामुळे युद्धविरोधी प्रचार करण्याचे ठरवण्यात आले. परंतु सामुहिक चळवळ न करता एकेका व्यक्तीने कायदेभंग करण्याचा निर्णय घेण्यात आला यालाच ___________ असे म्हणतात.
1) जंगल सत्याग्रह
2) वैयक्तिक सत्याग्रह
3) गुपित सत्याग्रह
4) भूदान सत्याग्रह
11.
खालीलपैकी पहिले वैयक्तिक सत्याग्रही कोण होते ?
1) आचार्य विनोबा भावे
2) प.जवाहरलाल नेहरू
3) मौलाना आझाद
4) साने गुरुजी
12.
खालीलपैकी कोण भूमिगत आंदोलनात सहभागी नव्हते ?
1) जयप्रकाश नारायण
2) प.जवाहरलाल नेहरू
3) डॉ. राममनोहर लोहिया
4) अरुणा असफअली
13.
भाई कोतवाल यांनी रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात कोणती संघटना स्थापन केली ?
1) आझाद हिंद सेना
2) आझाद दस्ता
3) आझाद रेडिओ
4) लाल सेना
14.
1942 साली महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात क्रांतिसिंह नाना पाटील यांनी प्रतिसरकार स्थापन केले ?
1) अहमदनगर
2) पुणे
3) नाशिक
4) सातारा
15.
1938 ला हरिपूरा येथे झालेल्या राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते ?
1) प. जवाहरलाल नेहरू
2) जे.बी.कृपलानी
3) सुभाषचंद्र बोस
4) महात्मा गांधी
16.
नजरकैदेतून वेषांतर करून निसटून सुभाषचंद्र बोस एप्रिल 1941 मध्ये ______ ला पोहोचले.
1) जपान
2) फ्रान्स
3) जर्मनी
4) इटली
17.
आग्नेय आशियातील देशप्रेमी भारतीयांना संघटीत करून जपानमध्ये 'इंडियन इंडिपेंडन्स लीग'ची स्थापना कोणी केली ?
1) सुभाषचंद्र बोस
2) स्वातंत्र्यवीर सावरकर
3) श्यामजी कृष्ण वर्मा
4) रासबिहारी बोस
18.
आझाद हिंद सेनेच्या महिंलाचे 'झाशीची राणी महिला पथक' च्या प्रमुख कोण होत्या ?
1) कॅप्टन सुचेता कृपलानी
2) कॅप्टन लक्ष्मी स्वामिनाथन
3) कॅप्टन लक्ष्मी शर्मा
4) कॅप्टन विना दास
19.
नोव्हेंबर 1943 मध्ये जिंकलेल्या अंदमान व निकोबार बेटांना सुभाषचंद्र बोस यांनी कोणती नावे दिली ?
1) हिंदुस्थान आणि भारत
2) आझाद आणि शहीद
3) शहीद आणि स्वातंत्र्य
4) शहीद आणि स्वराज्य
20.
18 फेब्रुवारी 1946 रोजी मुंबई येथील तलवार या ब्रिटीश युद्धनौकेवर कोणाच्या नेतृत्वामध्ये उठाव करण्यात आला ?
1) बी.सी.दत्ता
2) लक्ष्मी स्वामिनाथन
3) पी.सी.महालोनबीस
4) सी.एन.राव
This is more feedback!
This is the feedback!
feedback!
Back to Top